Posts

Showing posts from March, 2018

कोकणातील निसर्ग नवल

उन्हाळी सुटी आणि कोकणाचं अगदी घट्ट नातं आहे. उन्हाळ्यात नितांत सुंदर कोकण तर अनुभवता येतोच; पण येथे दडलेल्या निसर्ग नवलांमुळे आपल्या भटकंतीची मजा द्विगुणित होऊ शकते. तर यंदाच्या कोकण भटकंतीत थोडी वाट वाकडी करून हा अनुभव घ्यायला हरकत नाही. निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते. पण फळांचा राजा आंबा, तसेच फणस, काजू, करवंद अशा फळांची मेजवानी ही फक्त उन्हाळ्यातच अनुभवायला मिळते. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती कायमच कोकणला आहे. या सर्व निसर्गाच्या समृद्धीसोबतच अनेक निसर्गनवल कोकणात जागोजागी विखुरलेली पाहायला मिळतात. आपण कोकणात सडय़ावर कोरलेली मानवनिर्मित कातळशिल्पे यापूर्वी पाहिली आहेतच. त्याचसोबत अनेक निसर्गनिर्मित नवलस्थाने कोकणात आहेत. ती प्रत्येकाने अगदी आवर्जून पाहिली पाहिजेत. संगनातेश्वरचा सिंहनाद : मुंबई – गोवा महामार्गावर लांजा आणि राजापूरच्यामध्ये ओणी नावाचे गाव आहे. इथून एक रस्ता पाचलमार्गे अणुस्कुरा घाटाकडे जातो. याच पाचल गावापाशी अर्जुना नदीच्या तीरावर संगनातेश्वराचे प्राचीन मंदिर उभे आ...

भगत सिंग

Image
भगतसिंगांचे छायाचित्र टोपणनाव: भागनवाला जन्म: सप्टेंबर २७ , १९०७ ल्यालपूर , पंजाब, भारत मृत्यू: मार्च २३ , १९३१ लाहोर , पंजाब , ब्रिटिश भारत चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा संघटना: नौजवान भारत सभा कीर्ती किसान पार्टी हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन पत्रकारिता/ लेखन: अकाली, अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' धर्म: नास्तिक प्रभाव: समाजवाद , कम्युनिस्ट वडील: सरदार किशनसिंग संधू आई: विद्यावती _________________________________________________________________________________ भगत सिंग ( पंजाबी उच्चारण:  1907 – 23 मार्च 1931) एक भारतीय क्रांतिकारी समाजवादी नेता होते, ज्यांच्या ब्रिटिश विरुद्धच्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे  वयाच्या २३ व्या वर्षी त्यांना गळफासाची शिक्शा देण्यात आली, व भारतीय स्वतंत्र्य चळवळी मध्ये त्यांचे  नाव प्रसिद्ध झाले. डिसेंबर १९२८ मध्ये, भगत सिंग आणि एक सहकारी, शिवराम राजगुरू, ह्यांने प्राणघातकपणे 21 वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी, जॉन साँडर्सला, लाहोर, ब्रिटिश भारत, येथे गोळ्या घालुन ठार पाड...

How To Save Water in Daily Life

Image
Water is one of the most important resources for preserving life. However, it is also one of the most undervalued things there is in the world. In many developed countries, we tend to take water for granted because it flows easily out of the faucet. We use water without really thinking about it. It even seems strange that many people have no problem leaving the faucet running but we would go to war if someone tried to steal our oil. Since about 70% of the Earth’s surface is water-covered, many people can’t help but wonder – Why should we save water? Consider this: Up to 60% of the human adult body is water and our brains are approximately 80% water and our bones are 15-20% water We can live up to three weeks without food but only days without water However, 97% of the water on Earth is salt water Only 3% of the wo...

पाण्याचे महत्त्व जाणा

Image
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, हे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असले, तरी अजूनही पाण्याचे महत्त्व आपल्या लक्षात आलेले नाही. घरात २४ तास पाणी आहे, म्हणून पाणी भसाभस वापरले जाते. पण, एक दिवस नळाचे पाणी गेले, तरी तोंडचे पाणी पळते. मग महिनोनमहिने दुष्काळी परिस्थितीशी झुंजत असलेल्या, पाण्यासाठी अक्षरशः दाहीदिशा फिरणाऱ्या लोकांना त्याचे किती महत्त्व असेल. म्हणूनच पाणी जपून वापरले, त्याचे योग्य नियोजन केले तर ज्यांना पाणी मिळत नाही, अशा व्यक्तींच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो हे लक्षात घ्यायला हवे. असे वाचवा पाणी आरोग्य चांगले राखण्यासाठी आपण पाणी पितो. सर्वसाधारणपणे पिण्यासाठी पेलाभर पाणी घेतो. मात्र, खूपदा एखाद दुसरा घोट पाणी पिऊन उरलेले पाणी आपण फेकून देतो. हे दृश्य घरी, समारंभात बऱ्याचदा पाहायला मिळते. हे फेकून दिलेले पाणी आपण मोजले, तर आपण पाण्याचा किती मोठ्या प्रमाणात अपव्यय करतो हे कळेल. असा प्रयोग आपण आपल्या घरीही सहज करू शकता. दिवसभरात किती पाणी वाया जाते ते बघा. बऱ्याचदा कुठेतरी जवळपास नळ सुरू असल्याचा आवाज ऐकू येतो. पाण्याचा आवाज ...

‘पाणी बचतीचे महत्त्व ओळखण्याची गरज’

Image
बदलत्या वातावरणात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चे महत्त्व सर्वानी ओळखले पाहिजे. पाण्याची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करणे, ही काळाची गरज आहे.  बदलत्या वातावरणात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चे महत्त्व सर्वानी ओळखले पाहिजे. पाण्याची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करणे, ही काळाची गरज आहे. या वर्षी मराठवाडय़ात कमी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत पाण्याचे महत्त्व अधिकच जाणवणार आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.  संस्कार प्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या स्थानिक शाखेच्यावतीने रविवारी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अॅड. मधुकर गोसावी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. संस्कार प्रबोधिनीचे स्थानिक शालेय समिती अध्यक्ष विलास नाईक, त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक डॉ. विजयकुमार आराध्ये यांनी या वेळी बागडे यांचा सत्कार केला. या वेळी बागडे म्हणाले की,  १९८० या सुमारास आपण आणि स्व. प्रमोद महाजन यांनी निवडणुकीत एकत्रित काम केले. त्या वेळी आमच्...

चिमणी दिन (World Sparrow Day)

Image
२० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन (world sparrow day) म्हणून साजरा केल्या जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस – २० मार्च २०१० रोजी साजरा केल्या गेला. चिमणी वाचवा, घरटी बांधायला जागा द्या! आठवते का गं तुला, ती चिवचिवाट करणारी चिमणी? आजीने दाखविलेला, इकडे तिकडे मान फिरवीत चिवचिव करणारा व आजीच्या कडेवरून डुगुडुगु मान सावरत तू बोळकं पसरून, हसून स्वागत केलेला तो इवलासा पक्षी म्हणजेच चिऊताई. भारतात सर्वात जास्त संख्येने असणारा पक्षी म्हणून चिमणी परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते. हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत भारतभर सर्वत्र आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमारसह इतरही देशात आढळतो. भारतात काश्मिरी आणि उत्तर-पश्चिमी अशा याच्या किमान दोन...

" बाप "

“ती दोघेही‘ आपल्या आयुष्यात बरोबर चालत असतात; पण भावनांच्या पायवाटेवर चालताना “तो‘ मात्र कुठेतरी थोडासा मागे राहतो… प्रत्येक जण “तिच्या‘वर वारेमाप लिहितो, तोंडभरून बोलतो… पण “तो‘ मात्र असाच कुठेतरी अबोलपणे पडद्याआड लपून राहतो. प्रसंगानुरूप “तिच्या‘ डोळ्यांतले अश्रू पाहून आपल्याला वाईट वाटतं; पण त्याच अश्रूंना तळहातावर झेलून, मनातून ओघळणारा “तो‘ मात्र उपेक्षितच राहतो… लहानपणी पाठीवर बसवून खेळताना “तो‘ आपला घोडा असतो, गर्दीतली एखादी गोष्ट पाहण्यासाठी, गर्दीतून फिरण्यासाठी “त्याचा‘ आपल्याला खांदा असतो… आपल्याला हवं-नको पाहण्यासाठी, आपले बालहट्ट पुरवण्यासाठी, आपल्याभोवती नाचण्यासाठी “तोच‘ तर असतो… “तो‘ असतो म्हणून आपण असतो, “तो‘ राबतो म्हणून आपण खातो… “तो‘ जागतो म्हणून आपण जगतो… “तिच्या‘मुळे गजबजलेलं घर “त्याच्या‘मुळे सजलं जातं… “तिच्या‘ आपल्यावरच्या मायेने, तर “त्याच्या‘ असलेल्या धाकाने आपलं घर साधलं जातं… …”तो‘ तसाच असतो, बदामासारखा.. वरून कठीण कवच असणारा; पण आपली शक्ती वाढवणारा, बोट धरून चालायला शिकवणारा, पडलो-धडपडलो तर पुन्हा उठायला लावणारा… हाक मारली की एका हाकेला धावण...

गुडी पाडवा

गुडी पाडवा म्हणजे काय? चैत्र शुक्ल प्रतिपदेचे संस्कृत नाव गुडी पाडवा आहे. हा दिवस चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा करतात जो हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षाचा पहिला दिवस असतो. पाडवा किंवा पाडवो हा शब्द संस्कृत शब्द पड्ड्वा/पाड्ड्वो पासून आला आहे ज्याचा अर्थ आहे चंद्राच्या वाढत्या कलेचा (शुक्ल पक्षाचा) पहिला दिवस जो संस्कृत मध्ये प्रतिपदा म्हणून ओळखला जातो. हा हिंदू पंचांगानुसार मानल्या जाणाऱ्या साडे तीन मुहूर्तापैकी एक आहे, ज्या दिवशी कुठलीही वेळ नवीन धंधा किंवा वैयक्तिक कामाला सुरवात करण्यासाठी पवित्र मानली जाते. गुडी पाडव्यादिवशी काय करावे गुडी पाडव्या दिवशी, महाराष्ट्रीयन घरांमध्ये, खिडकीबाहेर गुडी उभारतात आणि सजवतात. उजळ हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे जरीची किनार असलेले कापड लांब बांबूच्या टोकाला बांधतात, त्यावर गाठी, कादुलीम्बाची पाने, आंब्याच्या डहाळया आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. चांदीचा किंवा तांब्याचा कलश त्यावर उलटा ठेवतात. ही गुडी घराबाहेर, खिडकीमध्ये, गच्चीवर किंवा उंच ठिकाणी उभारतात जिथून ती सर्वांच्या नजरेस पडेल. गुडी उभारण्याची काही महत्वाची क...

Dr. APJ Abdul Kalam

अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (तमिळ) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील ...

"सोनुर्ली देवी माउली मंदिर"

Image
सोनुर्ली देवी माउली मंदिर सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावही आपले वेगळेपण जपणारा. लोटांगणाच्या जत्रेसाठी हा गाव प्रसिद्ध! हजारो भक्तगणांची लोटांगणे जत्रोत्सवात पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. कोकणची दक्षिण काशी म्हणूनही सोनुर्ली माउली देवस्थान प्रसिद्ध आहे. माउलीच्या दरबारात भरणारी तुला प्रसिद्ध आहे. कोकण म्हटले की, कौलारू घरे, मातीच्या भिंती हे चित्र सहज डोळ्यांसमोर तरळते. पण आज सर्वत्र बिल्डरांचे प्रस्थ वाढले असल्याने स्लॅबच्या घरांचे जाळे पसरत चालले आहे. सोनुर्ली गाव मात्र त्याला अपवाद आहे. येथे स्लॅबचे घर नावाला सापडणार नाही. येथे मातीच्या भिंतींचा हळूहळू कायापालट होऊ लागला असला तरी या गावात भिंतीसाठी चिर्याचे दगड वापरले जात नाहीत. घरांच्या छप्परावर नळेच असावेत असा गाववासियांचा आजही आग्रह असतो. या परंपरेची जपणूक गाववासीय मोठ्या श्रद्धेने करतात. विटांची घरे येथे पाहावयास मिळतात. 'खेड्यामधले घर कौलारू' कसे असावे ते पाहावे तर इथेच! सुंदर सुंदर पहुडलेली घरे डोंगरमाथ्यावरून पाहताना तर चित्त हरपते. येथे स्लॅबची घरे बांधण्यास देवीचा कौल लागत नाही. काळेत्री द...

रेडी गणेश

Image
रेडी गणेश रेडी बंदर किनार्याजवळच लोह खनिजाच्या खाणीच्या परिसरात १८ एप्रिल १९७६ रोजी स्वयंभू श्री गणेशाची द्विभुजा मुर्ती दृष्टांत प्रकट झाली. या ठिकाणी श्रीगणेशाचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. दर संकष्ठीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमते. रेडी येथील नागोळा वाडीतील एक तरुण सदानंद नागेश कांबळी हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एक लोहखनिजाच्या कंपनीत नोकरीला होता. रेडीतील मायनिंगच्या खाणीवरुन बंदराकडे व बंदराकडून खाणीकडे त्याच्या लोहखनिज भरलेल्या ट्रकची सतत ये-जा होत असे दि. १८ एप्रिल १९७६ रोजी एका विशिष्ट ठिकाणी त्याने आपला ट्रक उभा केला व तो तेथेच झोपला. पहाटेच्या सुमारास त्याला स्वप्न पडले व स्वप्नामध्ये श्रीगणपतीने येऊन त्याच ठिकाणी खोदा आपले या ठिकाणी वास्तव्य आहे असा दृष्टांत दिला. त्यानुसार श्री.कांबळी व श्री.वासुदेव जुवेलकर यांनी मायनिंग कंपनीतील काही मजुरांच्या मदतीने खोदकामास सुरुवात केली. काही भागाचे खोदकाम करताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा व कानाचा भाग स्पष्ट दिसू लागला. लगेच ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या मंदिरात ही सर्व...

"अंतराळवीर" कल्पना चावला

Image
अवकाश आणि अवकाशवीर हा विषय निघाल्यावर कल्पना चावला ची आठवण निघाल्याशिवाय विषयच पूर्ण होऊ शकत नाही. चला आज जाणून घेऊया कोण होत्या कल्पना चावला आणि त्यांचे कार्य. अनेकांना असा गैरसमज आहे कि कल्पना चावला या भारतीय अंतराळवीर होत्या, तसे नसून त्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर होत्या. त्यांचा जन्म १७ मार्च १९६२ मध्ये हरियाणा येथे झाला. शिक्षण अंतराळवीर बनण्या साठी नक्कीच त्यांना कठोर परिश्रम करावे लागले. तरीही त्यांचे शालेय शिक्षण हे गावातीलच शाळेत झाले, वर फक्त उच्च-शिक्षणाच्या नावाखाली मोठमोठ्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमात मुले भरती करणाऱ्यांसाठी हे एक उदाहरण ठरू शकते. पंजाब मध्येच १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८४ मध्ये टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च-अभियांत्रिकी शिक्षण घेतले आणि १९८८ साली कोलोरॅडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून डॉक्टरेट मिळवली. कार्य १९८८ मध्ये त्यांनी नासा एम्स रिसर्च सेंटर मध्ये Vertical/Short Takeoff and Landing वर संगणकीय द्रव प्रेरक शक्ती [ Computational fluid dynamics (CFD) ] चे संशोधन केले. १९...

" स्वच्छतेचे महत्व "

स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियान किंवा स्वच्छ भारत मोहिम भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. प्रधान मंत्रींनीं २ ऑक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान जाहीर केले. राष्ट्रीय स्तरावर या अभियानाची दखल घेतली जात आहे. स्वच्छ भारत अभियान या मोहिमेचा एक मुख्य ध्येय आहे भारतातील सर्व शहरे आणि गावे “ओपन डेफकेशन फ्री” म्हणजेच हागणदारी मुक्त करणे. यासोबतच, स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश भारतातील रस्ते, रस्ते व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे ही आहे. या मोहिमेविषयी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे सर्व शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये स्वच्छता आणि शौचालयांची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करणे ही आहे. या स्वच्छ भारत अभियान भारत अभियानातून भारतीयांना स्वच्छतेचे महत्व आणि फायदे यांची जाणीव करून देणे हे सुद्धा आहे. विद्यार्थी म्हणून आपण स्वच्छ भारत अभियान, स्वच्छतेचे महत्व, स्वच्छतेचे फायदे असे विषय भाषण आणि निबंध स्पर्धांमध्ये पाहू शकता. काळजी करू नका! स्वच्छ भारत अभियान या विषयावर आम्ही येथे जास्तीत जास्...

सिंधुदुर्ग किल्ला

Image
सिंधुदुर्ग किल्ला  सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी याचे बांधकाम आरंभले. महत्त्व शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडी जिने आहेत.ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३ गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत.त्यांची नावे दूध विहीर,साखर विहीर व दही विहीर अशी आहेत.या किल्ल्यामध्ये महाराश्ट्रातील एकमेव शिवाजी महाराजांचे शंकराच्या रुपातील मंदीर आहे.याची स्थापना ‍राजाराम महाराजांनी केली होती. इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वर्‍हाड या प्रदेशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मा...

प्रतापगड

Image
‘‘प्रतापगड‘‘ ‘‘महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात’’ शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला तो म्हणजे ‘‘प्रतापगड‘‘. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला. ह्या सुप्रसिध्द घटनेमुळे व महाबळेश्वरच्या सानिध्यामुळे सर्वांना माहीती असलेला हा किल्ला आजही सुस्थित उभा आहे. इतिहास : १६५६ मध्ये चंद्रराव मोर्‍यांचा पराभव करुन शिवाजी महाराजांनी ‘जावळी‘ ताब्यात घेतली. जावळीच्या खोर्‍यात पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर ‘‘भोरप्या डोंगर‘‘ एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. ह्या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधायची आज्ञा महाराजांनी मोरोपंतांना दिली. मोरोपंतांनी दूर्गबांधणीचे कौशल्य पणाला लावून १६५८ साली बुलंद व अभ्येद्य किल्ला तयार केला; तोच हा प्रतापगड. प्रतापगडचे पहिले किल्लेदार म्हणून महाराजांनी अर्जोजी यादव ह्यांची नेमणूक केली. इ.स १६५९ साली अफजलखान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला. महाराजांनी युक्तीने त्याला प्रतापगडाखाली जावळीच्या खोर्‍यात आणले. दिनांक ९ नोव्हेंबर १६५९ रोजी दूपारी २ वाज...

मराठी भाषेचे भवितव्य

मराठी भाषेचे भवितव्य २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन!  त्यानिमित्ताने मराठी भाषेच्या सद्य:स्थितीसंबंधात चर्चा करणे उचित ठरावे. इंग्रजीचे आक्रमण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जाते. परंतु आज जागतिक संदर्भातही मराठीभाषिकांची असलेली प्रचंड संख्या पाहता तिच्या ऱ्हासाची ही भीती अनाठायी आहे असेच म्हणावे लागेल. खरे तर आज मराठी भाषेच्या संवर्धनाचे अनेकानेक मार्ग खुले झाले आहेत. संगणकीय तंत्रज्ञानही मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान आज मराठीत येत आहे. या सगळ्याला जोड असायला हवी ती आपल्या निग्रहाची.. मराठी भाषेबद्दल रास्त अभिमान बाळगण्याची.. आणि तिची जोपासना व संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची! मराठीभाषकांच्या स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन आज अर्धशतक उलटून गेले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाला गती आणि दिशा प्राप्त होईल असे वाटत होते. भाषावार प्रांतरचनेच्या मागणीमागचे उद्दिष्टही हेच होते. परंतु मराठी भाषा संवíधत करण्...