शेतकरी
जमिनीमध्ये पेरणी, लावणी, कापणी करून धान्य आणि फळे पिकवणाऱ्या माणासाला
"शेतकरी" म्हणतात. शेतकरी शेतात राबून वेगवेगळ्या हंगामांत वेगवेगळी पिके
घेऊन त्यातून उत्पन्न मिळवतात. ते बाजारपेठेत नेऊन व्यापाऱ्याला किंवा
ग्राहकाला विकून त्यावर उदरनिर्वाह करतात.वेगवेगळ्या हंगामात शेतकरी
वेगवेगळी पिके घेतात. पण आज शेतकरी खूप कमी प्रमाणात आहेत.कारण की आज
आपल्या घरी जे धान्ये येत ते फक्त शेतकरीमुळे आपण त्याचे आभार मानले
पाहिजे. .
पिकांचे नुकसान करतात म्हणून अमेरिकेतील लोकांनी कॅरोलविना पॅराकीट या पोपटाच्या सुंदर प्रजातीचा वंशच संपवून टाकला. माअोच्या आदेशानंतर चिनी नागरिकांनी लाखो चिमण्यांची कत्तल केली, त्याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासामारीचा सामना करावा लागला. पीक उत्पादनच न झाल्याने लाखो लोक मृत्युमुखी पडले. शेवटी चीन सरकारला रशियातून चिमण्या आयात कराव्या लागल्या.
इतिहास
शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिचा उगम आदिमानवाच्या विचारातून झाला. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात.भारतीय शेतकऱ्यांना लागणाऱ्या मूलभूत गोष्टी
शेतकऱ्यांला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम "सुपीक" जमीन आणि नंतर "पाणी". लागते. शेतीला मुबलक पाणी असेल तरच शेती करणे शक्य आहे. तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे "मनुष्यबळ". हे असले की शेतकरी शेतातील पिकांची निगा राखू शकतो. चौथे म्हणजे शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी लागणारा "पैसा" (भांडवल). आणि शेवटी जेथे तो त्याचा उत्पादित शेतमाल विकतो, ती "बाजार पेठ". शेतकऱ्यांसाठी त्याची शेतीच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील अन्य लोक कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात.भारतीय शेतकऱ्यावर येणारी संकटे
शेती करताना शेतकऱ्याला बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल अशा अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करावा लागतो, हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला कधी फळ मिळतेच असे नाही.शेतकऱ्यांचे मित्र
साप, बेडूक, फुलपाखरे, मधमाश्या कोंबड्या, शेळ्या असे अनेक प्राणी शेतकऱ्याचे मित्र असतात. सर्व पक्षी शेतातील धान्य खाऊन फस्त करतात अशी एक गैरसमजूत आहे. काही पक्षी शेतातील धान्य खात नसून पिकाची काढणी झाल्यावर शेतात पडलेले दाणे टिपतात. निसर्गातील कीड नियंत्रण आणि सारपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करतात.पिकांचे नुकसान करतात म्हणून अमेरिकेतील लोकांनी कॅरोलविना पॅराकीट या पोपटाच्या सुंदर प्रजातीचा वंशच संपवून टाकला. माअोच्या आदेशानंतर चिनी नागरिकांनी लाखो चिमण्यांची कत्तल केली, त्याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासामारीचा सामना करावा लागला. पीक उत्पादनच न झाल्याने लाखो लोक मृत्युमुखी पडले. शेवटी चीन सरकारला रशियातून चिमण्या आयात कराव्या लागल्या.
Comments
Post a Comment