Posts

Showing posts from July, 2018

सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्य धोक्यात

Image
स्पर्धात्मक करिअर, घड्याळाच्या काट्यावर धावण्याची सवय, नोकरीच्या, रोजगाराच्या, व्यवसायाच्या, कौटुंबिक समस्या असोत किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या या अनेक कारणांमुळे आजची तरुणाई कायम मानसिक तणावात असल्याचे दिसून येते. त्यातच आता सोशल मीडियावरील सततचा वावर, ऑनलाइन गेमचे व्यसन आदी कारणांची भर पडली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अहवालातून मुंबई शहर तसेच उपनगरातील लोक सर्वाधिक ताणतणावात असून, त्यांना मानसोपचाराची गरज असल्याचे समोर आले आहे. मुंबईपाठोपाठ कोलकाता आणि बेंगळुरू या शहरांचा क्रमांक लागतो.. मानसोपचाराची गरज असलेल्या राज्यांमध्ये पश्चिम बंगाल आघाडीवर असून, महाराष्ट्र दुसऱ्या तर, कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झालं आहे. आरोग्य मंत्रालयाने केलेल्या पाहणीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक तरुणांना नैराश्याने ग्रासल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जे. जे. हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने हे सर्वेक्षण केले आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. चि...

आई, आमचे आत्मबळ!

आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातातील नोकरी सोडून दिली. राजीनामा द्यायला जात असताना टॅक्सीत एक गाणे सुरू होते- ‘तेरा साथ है तो, मुझे क्या कमी है, अंधेरे मे भी मिल रही रोशनी है...’ मी त्या टॅक्सी ड्रायव्हरला हे गाणे वारंवार लावायला सांगत होतो. यावेळी डोळ्यांपुढे फक्त आई होती. आई, आम्हा बहीणभावाचे आत्मबळ... ऐन उमेदीच्या काळात एकामागोमाग एक संकटे येत गेली की भलीभली माणसे खचतात. मी नेमका अशा विपरीत परिस्थितीत सापडलो. नव्हे आमचे सारे कुटुंब सापडले. या अडचणीच्या-संकटांच्या काळात आई कणखरपणे आणि हिमतीने उभी राहिली. तिने आम्हाला भावाबहिणींना केवळ सांभाळले नाही, तर आमच्यात आत्मविश्वास पेरला. मला आत्मबळ दिले. तिच्या या आत्मबळाच्या भरवशावर पुढे यश संपादन करता आले. माझे, माझ्या बहिणींचे यश हे वडिलांची इच्छा आणि आईचे स्वप्न होते. ते पूर्ण होण्यामागे आई हेच निमित्त ठरली. आई हीच प्रेरणा ठरली. मी एमएस्सीला असताना वडील नीळकंठराव यांचे आकस्मिक अपघाती निधन झाले. आमच्या कुटुंबावर संकट कोसळले. आई प्रभावती हिने स्वत:ला सांभाळले. आपण खचून चालणार नाही. माझी हिंमत हीच मुलांची हिंमत बांधेल याची पु...

वारी आणि चंद्रभागा

Image
वारी आली की स्मरणरंजनाच्या भावना जागतात. आईची आई स्वतः अभंग रचायची. प्रा. र. बा. मंचरकरांनी तिचे अभंग संपादित केले होते. वडिलांची आई देखील नियमित वारीला जाई. वारीच्या आठवणींशी या दोन्ही आज्यांनी दिलेले प्रेम, भोगलेली दु:खे, त्यांची बघितलेली मरणे निगडित आहेत. वारीला त्या आठवणी घट्ट चिकटलेल्या आहेत. भजनांचे अस्वस्थ करणारे गजर, आज्यांचे चेहरे, त्यांचे शेवटचे दिवस, आजारपणे, अंत्ययात्रा, नंतरची पोकळी आणि खूप काही. देव कुठला चमत्कार करीत नाही. त्यानेच जग निर्मिले असेल तर त्या जगातले पदार्थ विज्ञानाचे किंवा कोणत्याही शास्त्राचे नियम तो का म्हणून मोडील? देवावर भार टाकणाऱया आणि कुठल्याच दु:खाबद्दल तक्रार न करणाऱया आज्यांचे जगणे आठवताना हे सगळे अबोधपणी त्यांच्याकडे बघून मनात रुजले. तो वेगळाच विषय. पण वारीच्या निमित्ताने वेगळे लिहायचे आहे. आमच्या शहराच्या पेठांमध्ये अनेक कुटुंबात घरगुती पातळीवर वारीचे उराउरी उत्कट स्वागत होते. अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे वारकऱयांना आवर्जून घरी बोलावतात. परवा आमच्या शेजारच्या वाडय़ात भोजनाला गेलो होतो. त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून ही प्रथा आहे. ...