सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्य धोक्यात

स्पर्धात्मक करिअर, घड्याळाच्या काट्यावर धावण्याची सवय, नोकरीच्या, रोजगाराच्या, व्यवसायाच्या, कौटुंबिक समस्या असोत किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या या अनेक कारणांमुळे आजची तरुणाई कायम मानसिक तणावात असल्याचे दिसून येते. त्यातच आता सोशल मीडियावरील सततचा वावर, ऑनलाइन गेमचे व्यसन आदी कारणांची भर पडली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अहवालातून मुंबई शहर तसेच उपनगरातील लोक सर्वाधिक ताणतणावात असून, त्यांना मानसोपचाराची गरज असल्याचे समोर आले आहे. मुंबईपाठोपाठ कोलकाता आणि बेंगळुरू या शहरांचा क्रमांक लागतो.. मानसोपचाराची गरज असलेल्या राज्यांमध्ये पश्चिम बंगाल आघाडीवर असून, महाराष्ट्र दुसऱ्या तर, कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झालं आहे. आरोग्य मंत्रालयाने केलेल्या पाहणीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक तरुणांना नैराश्याने ग्रासल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जे. जे. हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने हे सर्वेक्षण केले आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. चि...