गुरुसेवा

 *गुरुसान्निध्यात असणार्या शिष्याची पत्रिका कितीही वाईट असू द्या. जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वरसेवा समजून केली तर गुरूंचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते. सामान्य मनुष्य किंवा ज्योतिषी त्यात बदल करू शकत नाही. टेंबे स्वामींच्या बाबतीत घडलेली घटना आहे. एका स्त्रीचा मुलगा खूप आजारी पडला. ती एका ज्योतिषाकडे गेली असता त्याने तिला मुलाच्या पत्रिकेत त्यावेळी मृत्यूयोग असल्याचे सांगितले. ती बाई रडत स्वामींकडे गेली. स्वामींनी पत्रिका पाहिली. पत्रिकेतील ग्रहांची स्थाने बदलून नवी पत्रिका मांडली. मुलाचा मृत्यूयोग टळला. जसे ड्रायव्हरला गाडी कुठेही थांबवता येते  कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते. पण प्रवाशाचे ते नसते. तसेच या शक्तीचे आहे म्हणून गुरूंचा अधिकार आणि आधार ईश्वरापेक्षा मोठा असतो. शिष्याने गुरूंना केव्हाही कोठूनही हाक मारली तरी गुरू त्याच्या मदतीला धावून जाणारच. पण त्याच्या हाकेत ती श्रध्दा, ती आर्तता असली पाहिजे !*

Comments

Popular posts from this blog

" स्वच्छतेचे महत्व "

प्लास्टिक नावाचा भस्मासुर

पाण्याचे महत्त्व जाणा