दसरा

 विजयादशमीच्या दिवशी एकमेकांना आपटयाची पाने का देतात यामागे एक कथा सांगीतली जाते ती अशी….
फार पुर्वी ज्यावेळी गुरूशिष्य परंपरा होती त्या काळी वरतंतु नावाचे गुरू शिष्यांना आपल्या आश्रमात ज्ञानदानाचे कार्य करीत असत. कौत्स नावाचा एक शिष्य त्यांच्याकडे विद्या अर्जित करण्याकरीता राहात असे.

ज्यावेळी विद्याभ्यास पुर्ण झाला त्यावेळी कौत्साने गुरूजींना गुरूदक्षिणेबद्दल विचारले त्यावेळी वरतंतु ऋषी म्हणाले ’’वत्सा विद्या अर्थात ज्ञान हे दान करण्याकरीता असते त्याचा मोलभाव करायचा नसतो त्यामुळे मला गुरूदक्षिणा नको ’’
परंतु कौत्स ऐकेचना त्यामुळे गुरूजी म्हणाले ’’मी तुला चैदा विद्यांचे ज्ञान दिले म्हणुन तु मला चैदा कोटी सुवर्ण मुद्रा द्याव्यास ’’. हे ऐकुन कौत्स या सुवर्ण मुद्रा प्राप्त करण्याकरता निघाला परंतु त्या जमविणे तेवढे सोपे काम नव्हते.
कौत्स रघुराजाकडे गेला आणि चैदा कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली परंतु काही वेळापुर्वीच रघुराजाने आपली संपुर्ण संपत्ती ब्राम्हणांना दान केली होती पण तरी देखील राजाला कौत्साला विन्मुख जाऊ द्यायचे नव्हते म्हणुन रघुराजाने कौत्साला तीन दिवस थांबण्यास सांगीतले आणि त्याला स्वतःजवळच ठेऊन घेतले.
रघुराजाने इंद्रदेवाला आपली उर्वरीत रक्कम देण्यास फर्मावले अन्यथा युध्दास तयार हो म्हणुन सुनावले. इंद्रदेवाने त्वरीत रघुराजाच्या नगरीबाहेर कुबेरा करवी आपटयाच्या आणि शमीच्या झाडांवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवीला.
रघुराजाने कौत्सास हव्या तेवढया सुवर्ण मुद्रा घेउन जाण्यास सांगीतले परंतु कौत्साने केवळ चैदा कोटी सुवर्ण मुद्रा घेतल्या आणि त्या वरतंतु ऋषींना घेण्याची विनंती केली.
उर्वरीत सुवर्ण मुद्रांचे कौत्साने आपटयाच्या आणि शमीच्या झाडाखाली ढिग रचले आणि सामान्य नगरवासीयांना हव्या तेवढया मुद्रा घेउन जाण्याची विनंती केली. तो दिवस विजयादशमीचा होता.
अचानक श्रीमंत होण्याची संधी चालुन आल्याने नगरवासीयांनी आपटयाच्या आणि शमीच्या झाडाची पुजा केली आणि तेव्हांपासुन सुवर्णमुद्रंाऐवेजी आपटयाच्या पानांची देवाणघेवाण या दिवशी सुरू झाली.

*आपटयाचे झाड किवा आपट्याची पाने*

आपटयाच्या झाडाला अश्मंतक आणि वनराज देखील म्हणतात. कफ व पित्त दोषांवर ही पानं गुणकारी समजल्या जातात.

*शमीचे झाड किंवा शमिचे  पत्र*

पांडव ज्यावेळी अज्ञातवासात निघुन गेले त्यावेळी त्यांनी त्यांची सर्व शस्त्रं शमीच्या झाडामधे लपवीली होती त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी शमीची देखील पुजा केली जाते.
एकमेकांमधले… परस्परांमधले प्रेम व्यक्त करण्याचा हा शुभदिन दसरा अत्यंत संुदर असा सण आहे. वर्षातील हाच एकमेव असा दिवस आहे ज्या दिवशी आपण आवर्जृन एकमेकांची भेट घेण्याचा प्रयत्न करतो. सोशल मिडीयाच्या माध्यमातुन एकमेकांना शुभेच्छा देतो व सद्भावना व्यक्त करतो.
साधुसंत येती घरा तोची दिवाळी  दसरा असे म्हणत संत तुकाराम महाराजांनी कितीतरी पुर्वीच या सणाचे महत्व आपल्या काव्यातुन अधोरेखीत केले आहे.

Comments

Popular posts from this blog

" स्वच्छतेचे महत्व "

प्लास्टिक नावाचा भस्मासुर

पाण्याचे महत्त्व जाणा