चापेकरांच्या रँडवध पराक्रम

 ★चापेकरांच्या रँडवध पराक्रमाला आज १२४ वर्षे पूर्ण झाली★


एका घरातील तीन सख्खी भावंडे देशकार्यार्थ फासावर जातात ही सोपी गोष्ट नव्हे....यासाठी त्यांना कोणी आमिष दाखवले नव्हते वा त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी अथवा बक्षीस मिळणार नव्हते...असे असूनही देशासाठी घरच्या लोकांची पर्वा न करणारे हे क्रांतिवीर कोणत्या मुशीतून घडले असतील असा प्रश्न आजची अवस्था पाहून मनात दाटून येतो...यांच्या माघारी घरात राहिले ते वृद्ध वडील,तीन विधवा आणि तीन लहान मुले...!! सर्व समाजाने तर जणू देशभक्तीच्या अपराधास्तव यांना वाळीत टाकले होते...मदत केली तर सरकार आपले काय करील,या भीतीने कोणी सहाय्यासाठी येत नव्हते...अशा वेळी लोकमान्यांनी मदत केली...स्वराज्य मिळाल्यावरही थोरल्या चापेकरांची पत्नी जिवंत होती...१९५६ मध्ये त्या गेल्या....पण सरकारने त्यांना ताम्रपट वगैरे दिला नाही...कारण एकच अपराध...त्यांचा पती सशस्त्र क्रांतिकारक होता...कोणी सत्याग्रही नव्हता....!!

आज जातीयद्वेषाच्या काळात तर पुन्हा एकदा या क्रांतीवीरांवर त्यांची जात काढून चिखलफेक होते...आणि आम्ही हे सर्व पाहतोय.....!!

ज्यांनी सर्व देशवासीयांसाठी आपले प्राण वेचले त्यांना केवळ जातीच्या कुंपणात बांधून अवहेलना करण्यात येते आहे....

यासाठीच स्वराज्य मिळाले आहे काय..??

Comments

Popular posts from this blog

" स्वच्छतेचे महत्व "

प्लास्टिक नावाचा भस्मासुर

पाण्याचे महत्त्व जाणा