Posts

Showing posts from October, 2020

*सुंदर बोधकथा*

 एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्या घरात दारिद्र्य येणार अाहे.परंतु मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे. तुझी इच्छा असेल ते माग. माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येणारंच असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा राहू दे. लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली. काही दिवसानंतर - धाकटी सून स्वयंपाक बनवत होती, तिनं भाजीला मीठमसाला टाकला आणि दुसरं काम करायला निघून गेली.त्यानंतर मोठी सून आली, न चाखताच मीठ टाकलं, आणि कामाला निघून गेली.त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मीठ टाकलं आणि निघून गेल्या.जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला तर भाजी खारट लागल्यावर तो समजून गेला की दारिद्र्य आलेलं आहे. त्यानं काही न बोलता जेवण केलं आणि निघून गेला.त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला, तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं? बाबांनी जेवण केलं का? तेव्हा बायकोनं हो म्हटलं. नंतर त्यानं विचार केला जेव्हा वडील काही बोलले नाही तर मी कशाला बोलू?त्याचप्रमाणे परिवारातल्या सगळ्या...

"छत्रपती शिवाजी महाराज"

  ३०० किलोमीटर लांबीची भिंत  बांधायला १५० वर्षे लागली. मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या ५०वर्षांच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी ४००० किलोमीटर भरेल चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे ... ? ब्रिटिश लोक ॐ या शब्दा वर संशोधन करातायेत की ॐ बोलल्याने शरीरात उर्जा का निर्माण होते...पण मला असा वाटतं अहो खर संशोधन तर "छत्रपती शिवाजी महाराज" या नावावर करायला हवे......कारण हे नाव घेताच अंगावर काटा उभा राहतो... हृदयाचे ठोके वाढतात...शरीरात एक वेगळीच उर्जा निर्माण होते...छाती अभिमानाने फूलते असे का?  ....जय शिवराय.......          जगदंब ! जगदंब ! जगदंब ! १२ महिने... , ११ खेळाङू..., १० बोटे..., ९ ग्रह..., ८दिशा..., ७ आश्चर्य..., ६ संवेदना... , ५ महासागर... , ४ वेद... ,  ३ रूतु...,  २ डोळे ... आणि....फक्त 1 शिवबा... "एकच राजे शिवराय माझे" सुर्य नारायण जर उगवले नसते तर.. आकाशाचा रंगचं समजला नसता.. जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर.. खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता.. हे हिंदु प्रभो शिव...

दसरा

 विजयादशमीच्या दिवशी एकमेकांना आपटयाची पाने का देतात यामागे एक कथा सांगीतली जाते ती अशी…. फार पुर्वी ज्यावेळी गुरूशिष्य परंपरा होती त्या काळी वरतंतु नावाचे गुरू शिष्यांना आपल्या आश्रमात ज्ञानदानाचे कार्य करीत असत. कौत्स नावाचा एक शिष्य त्यांच्याकडे विद्या अर्जित करण्याकरीता राहात असे. ज्यावेळी विद्याभ्यास पुर्ण झाला त्यावेळी कौत्साने गुरूजींना गुरूदक्षिणेबद्दल विचारले त्यावेळी वरतंतु ऋषी म्हणाले ’’वत्सा विद्या अर्थात ज्ञान हे दान करण्याकरीता असते त्याचा मोलभाव करायचा नसतो त्यामुळे मला गुरूदक्षिणा नको ’’ परंतु कौत्स ऐकेचना त्यामुळे गुरूजी म्हणाले ’’मी तुला चैदा विद्यांचे ज्ञान दिले म्हणुन तु मला चैदा कोटी सुवर्ण मुद्रा द्याव्यास ’’. हे ऐकुन कौत्स या सुवर्ण मुद्रा प्राप्त करण्याकरता निघाला परंतु त्या जमविणे तेवढे सोपे काम नव्हते. कौत्स रघुराजाकडे गेला आणि चैदा कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली परंतु काही वेळापुर्वीच रघुराजाने आपली संपुर्ण संपत्ती ब्राम्हणांना दान केली होती पण तरी देखील राजाला कौत्साला विन्मुख जाऊ द्यायचे नव्हते म्हणुन रघुराजाने कौत्साला तीन दिवस थांबण्यास सांगीतले आणि...

गुरुसेवा

 *गुरुसान्निध्यात असणार्या शिष्याची पत्रिका कितीही वाईट असू द्या. जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वरसेवा समजून केली तर गुरूंचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते. सामान्य मनुष्य किंवा ज्योतिषी त्यात बदल करू शकत नाही. टेंबे स्वामींच्या बाबतीत घडलेली घटना आहे. एका स्त्रीचा मुलगा खूप आजारी पडला. ती एका ज्योतिषाकडे गेली असता त्याने तिला मुलाच्या पत्रिकेत त्यावेळी मृत्यूयोग असल्याचे सांगितले. ती बाई रडत स्वामींकडे गेली. स्वामींनी पत्रिका पाहिली. पत्रिकेतील ग्रहांची स्थाने बदलून नवी पत्रिका मांडली. मुलाचा मृत्यूयोग टळला. जसे ड्रायव्हरला गाडी कुठेही थांबवता येते  कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते. पण प्रवाशाचे ते नसते. तसेच या शक्तीचे आहे म्हणून गुरूंचा अधिकार आणि आधार ईश्वरापेक्षा मोठा असतो. शिष्याने गुरूंना केव्हाही कोठूनही हाक मारली तरी गुरू त्याच्या मदतीला धावून जाणारच. पण त्याच्या हाकेत ती श्रध्दा, ती आर्तता असली पाहिजे !*