Posts

Showing posts from July, 2021

..........जात..........

 जातीचं काय घेऊन बसलात राव अरे जात म्हणजे काय ? 👌 माहित तरी आहे का..? अरे कपडे शिवणारा शिंपी, ! तेल काढणारा तेली, ! केस कापणारा न्हावी.! लाकुड़ तोडणारा सुतार.! दूध टाकणारा गवळी.! गावोगावी भटकणारा बंजारा.! पुजा-अर्चा, पौरोहित्य करणारा ब्राह्मण.! वृक्ष लावणारा माळी.! आणि लढाई लढणारा क्षत्रिय.! आलं का काही डोस्क्यात..? आरं काम म्हणजे जात. आता भांडत बसण्यापेक्षा जाती बदला. आता इंजीनीयर ही नवी जात . कॉम्प्यूटर, केमिकल ही पोटजात. "सी. ए" ही पोटजात, "एम. बी. ए" ही नवी जात. बदला की राव कवाचं तेच धरुन बसलात! घरीच दाढी करता नवं?  मग काय न्हावी का? बुटाला पालीश करता नव्हं? मग काय चांभार का? गैलरी टेरेस वर झाडे लावता ना ! मग माळी का? घरच्या घरीच पुजा-अर्चा करता नव्ह?..,,मग ब्राम्हण का ? दूध टाकणारा मुलगा गवळी का? आरं बायकोच्या धाकानं का हुईना संडास साफ करता नव्हं? आता अजून बोलाया लावू नका ! आरं कोण मोठा कोण छोटा?  ह्याला बी दोन हात त्याला बी दोनच नव्हं? ह्यालाबी खायला लागतं आणि त्याला पण? आरं कामानं मोठं व्हा जातीनं न्हाय! आरं तुम्ही ह्या जातीत जन्माला आला,  हा काय तुमचा पराक्...

चापेकरांच्या रँडवध पराक्रम

 ★चापेकरांच्या रँडवध पराक्रमाला आज १२४ वर्षे पूर्ण झाली★ एका घरातील तीन सख्खी भावंडे देशकार्यार्थ फासावर जातात ही सोपी गोष्ट नव्हे....यासाठी त्यांना कोणी आमिष दाखवले नव्हते वा त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी अथवा बक्षीस मिळणार नव्हते...असे असूनही देशासाठी घरच्या लोकांची पर्वा न करणारे हे क्रांतिवीर कोणत्या मुशीतून घडले असतील असा प्रश्न आजची अवस्था पाहून मनात दाटून येतो...यांच्या माघारी घरात राहिले ते वृद्ध वडील,तीन विधवा आणि तीन लहान मुले...!! सर्व समाजाने तर जणू देशभक्तीच्या अपराधास्तव यांना वाळीत टाकले होते...मदत केली तर सरकार आपले काय करील,या भीतीने कोणी सहाय्यासाठी येत नव्हते...अशा वेळी लोकमान्यांनी मदत केली...स्वराज्य मिळाल्यावरही थोरल्या चापेकरांची पत्नी जिवंत होती...१९५६ मध्ये त्या गेल्या....पण सरकारने त्यांना ताम्रपट वगैरे दिला नाही...कारण एकच अपराध...त्यांचा पती सशस्त्र क्रांतिकारक होता...कोणी सत्याग्रही नव्हता....!! आज जातीयद्वेषाच्या काळात तर पुन्हा एकदा या क्रांतीवीरांवर त्यांची जात काढून चिखलफेक होते...आणि आम्ही हे सर्व पाहतोय.....!! ज्यांनी सर्व देशवासीयांसाठी आपल...

🌹प्रवचनाचा विषय🌹

          🟠🟣🟠गुरु कशाला हवा❓🟠🟣🟠 💠व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरू करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरू नको असे म्हणून कसे चालेल❓💠 ❄प्रपंचात सुखदुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील, अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरू करील. ❄ ✴प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न. शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य, आणि जो शिकवितो तो गुरू. मला काही कळत नाही असे ज्याला वाटतो तोच गुरू करील.✴ 🔸️मी 'राम राम' म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरू कशाला हवा, असे काहीजण म्हणतात. 'मी' केले ही जाणीव आड येते, म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला❓अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार.🔸️ 🏵देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंतांनी त्याला 'गुरू कर' म्हणून सांगितले.🏵 💢संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे. जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरू कसे म्हणावे❓जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो. सं...

विनायक दामोदर सावरकर

 बाळा तुझे नाव नाही सांगितलेस"? टाळ्यांच्या कडकडाटातच तो तरुण खाली बसला. तरुण कसला, १५ वर्षांचा मुलगाच तो! तब्बल दोन मिनिटे टाळ्या वाजत होत्या. सलग! पण नुसत्या टाळ्याच नव्हत्या बरं..! त्या कडकडाटातही श्रोत्यांचे आवाज येतच होते. कुणी म्हणत होतं, "काय बोललाय छोकरा.. आजवर एवढी व्याख्यानं ऐकली पण एवढ्या लहान मुलाने असं भाषण दिलेलं..? अंहं! कधीच ऐकलं नव्हतं!!" त्यावर एकजण म्हणाला - "दुसरा लोकमान्य होणार हा, लिहून घ्या!!" तर तिसऱ्याचे, "पण केवढा सुकुमार आहे नाही? देखणा.. राजबिंडा!" यावर चौथा, "हो ना, वाटतंय की आपल्या या छोट्याश्या दहिवली गावात कुणी राजपुत्रच अवतरलाय. देखणा, विद्वान आणि खिळवून ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा धनी..!" लहानग्यांची आणि किशोरांची वक्तृत्वस्पर्धा होती ती. होता होता स्पर्धा संपली. सूत्रसंचालकाने तसे घोषित केले आणि त्यासोबतच स्पर्धेच्या अध्यक्षांना विनंतीही केली - निकाल संपण्यापूर्वी दोन शब्द बोलण्याची! अध्यक्षमहोदय बोलायला उभे राहिले. एकवार सगळ्यांवरून नजर फिरवली त्यांनी. मऊशार भात खाताना अचानकच खडा लागावा, तशी त्यांची नजर मघाशी...

पुण्याई

 यात्रेकरूंनी भरलेली एक बस यात्रा संपवून परतीच्या प्रवासाला लागलेली असते. वाटेत अवकाळी पाऊस हजेरी लावतो. विजांच्या कडकडाटामुळे सगळेच प्रवासी घाबरलेले, भेदरलेले असतात. जीव मुठीत घेऊन प्रवास सुरु असतो. अशात दोन तीनदा अपघाताचे प्रसंग येतात. पाऊस काही केल्या थांबायचे नाव घेत नाही पाहून, बसचालक बस थांबवण्याचा निर्णय घेतो. रात्र अधिक गडद होत जाते. पुढचा प्रवास लांबत जातो.  बसचालक म्हणतो, 'आज आपल्यापैकी नक्कीच कोणाचा मृत्यू निश्चित आहे. त्या एकामुळे सर्वांवर काळ ओढावलाय. त्यामुळे तो जो कोणी आहे, त्याने बसमधून निघून जावं आणि बाकीच्यांचे प्राण वाचवावेत.  बसमध्ये सगळेच ज्येष्ठ! बसचालकाच्या या वाक्याने सगळेच संभ्रमित होतात. एकमेकांकडे संशयाने पाहतात. त्यातला एक जण म्हणतो, 'पण मृत्यू कोणाचा येणारे हे कसे कळणार?'  बसचालक म्हणतो, 'बस थांबली आहे, त्याच्या समोर काही अंतरावर एक झाड आहे. माझ्यासकट प्रत्येकाने जाऊन त्या झाडाला हात लावून यायचं. ज्याचा मृत्यू यायचा असेल तो जाईल बाकी वाचतील.' सगळे जण भीत भीत तयार होतात. बसचालक स्वतः सुरुवात करून देतो. पाऊस, विजा, कडकडाट, वादळ, सोसाट्याचा...

ओढाताण

मराठी भाषेतील काही शब्द.... नुसते शब्द नाहीत तर भावगुरु आहेत ते. त्यातलाच एक शब्द आहे....ओढाताण. व्याकरणीक विश्लेषण न करता त्यातील भावार्थ फारच उद्बोधक कसा आहे त्याचा शोध आपण घेऊया. आयुष्यात ज्याने संघर्ष केला... त्याची ओढाताण काही कमी झाली नाही. ओढ आणि त्यातून निर्माण झालेला ताण काही घडवतो तरी वा काहीतरी बिघडवतो तरी.मुळात ओढ ही मनाच्या खणपटीला कायम बसून असते. कोणाला वाचनाची ओढ.. कोणास कामाची ओढ.. कोणास झोपेची.. कोणास आळसाची तर कोणास माणसांची ओढ असते. ओढीशिवाय जीवन नाही. ओढीशिवाय जीवनात रंगत नाही. ओढीची संगत असेल तर त्याचा ध्यास होतो. ध्यासाचं ध्येय होतं. ध्येयाचं उद्दिष्ट होतं. उद्दिष्ट साध्य करताना ताण येतो. सुकर ताण साध्यासाठी प्रेरक ठरतो. अतिरिक्त ताण काम नासवतो. ध्येय नासवतो. नाती नासवतो. विचार नासवतो. कधी कधी जीवन नासवतो. ओढ जशी हवीहवीशी वाटते त्याबरोबर येणारा ताणही हवासा वाटावा. त्यामुळे ताण खूप ताणला जात नाही.... आणि मग हलकेपणा येतो. अतिरिक्त ताण हा माणसांनी माणसांसाठी केलेली वाईट योजना आहे. समजूतदारपणा ज्यांच्यात आहे ते ताण देऊन ताणही तुटेल, असं कधी वागत नाही. जोडाजोडी आणि तडज...